
पुणे: मागील काही वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यास इच्छुक असलेले कार्यकर्ते, स्थानिक नेत्यांचे या निवडणुका कार्यक्रमांकडे लक्ष लागले आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तर, दुसरीकडे राज्याचे उपमु्ख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाष्य करताना संभाव्य कार्यक्रमच सांगितला आहे. अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना या निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत.
